आपला जिल्हाकृषी व व्यापारमहाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली

काळम्मावाडी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

 राधानगरी, खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा: जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणात 3.12 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

 पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा नदीवरील- चिंचोली, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली, घटप्रभा नदीवरील- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी, हिरण्यकेशी नदीवरील – साळगांव, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, हल्लारवाडी, काकर व माणगाव, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड असे 28 बंधारे पाण्याखाली आहेत.

 आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 3.12 टीएमसी, तुळशी 1.48 टीएमसी, वारणा 13.85 टीएमसी, दूधगंगा 6.53 टीएमसी, कासारी 1.03 टीएमसी, कडवी 1.41 टीएमसी, कुंभी 0.97 टीएमसी, पाटगाव 1.90 टीएमसी, चिकोत्रा 0.52 टीएमसी, चित्री 0.79 टीएमसी, जंगमहट्टी 0.68 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 0.93 टीएमसी, सर्फनाला 0.15 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.15 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. जांबरे मध्यम प्रकल्प आज दि. 5 जुलै 2024 रोजी पहाटे 2 वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे.

 तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 26 फूट, सुर्वे 25.2 फूट, रुई 55.2 फूट, इचलकरंजी 52.4 फूट, तेरवाड 43.3 फूट, शिरोळ 36.3 फूट, नृसिंहवाडी 33.6 फूट, राजापूर 22.8 फूट तर नजीकच्या सांगली 10 फूट व अंकली 12.7 फूट अशी आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.