आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दूधगंगा जलाशयात १७.६७ टीएमसी पाणीसाठा

जलाशयातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ 

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

 

ख. प्रज्ञावंत वृत्तसेवा/ राधा.(दि. २४ जुलै): कोल्हापूर जिल्ह्यात मागील सात – आठ दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी -नाले आता तुडुंब भरून वाहत आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील ८१ बंधारे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे सध्या कोल्हापूर जिल्हा सर्वत्र जलमय दिसत आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे पाणीसाठा असणारे काळम्मावाडी येथील दूधगंगा जलाशय आजपर्यंत १७.६७ टीएमसी इतके भरले आहे.

      दिनांक २४ जुलै रोजीच्या सकाळी सातच्या अहवालानुसार सध्या धरणात ५००. ५२८ द. ल. घ. मी. इतका पाणीसाठा असून ६९.६० टक्के धरण भरले आहे. तर काल दिवसभरातील राधानगरी तालुक्यात ८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील तीन दिवसांपूर्वी धरणातील पाणीसाठा १५.०१ टीएमसी इतका होता तर आज रोजी तब्बल २ टीएमसी इतकी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढत चालल्याने धरणातील पाणीसाठ्यात ही कमालीची वाढ जाणवत आहे. आजपर्यंत राधानगरी तालुक्यात १७९७.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे

.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.