आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडी
सिद्धनेर्ली नदीकिनाऱ्यावरील पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद
पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू
खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा/दि.२ऑगस्ट: सतत धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे कागल – मुरगूड मार्गावरील सिद्धनेर्ली तालुका कागल नदी किनाऱ्यावर असणाऱ्या दूधगंगा नदीवरील पुलावर पाणी आले आहे त्याचप्रमाणे सिद्धनेर्ली तून एकोंडी कडे जाणाऱ्या मार्गावरही पाणी आल्याने हे दोन्ही मार्ग वाहतूकीसाठी बंद केले आहे. त्यामुळे सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती मिळताच तहसिलदार अमरदीप वाकडे , पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, सिद्धनेर्ली सरपंच दत्तात्रय पाटील, ग्रामविकास अधिकारी अजित जगताप यांनी या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.